Tuesday, May 26, 2026

महाराष्ट्र शासनाने जनकल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत सोईस्‍करपणे पोहोचवण्‍यासाठी पब्लिक अ‍ॅपसोबत सहयोग केला


मुंबई, २६ मे २०२६:
महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत सहज पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या नोंदणीमध्ये वाढ करण्यासाठी पब्लिक अ‍ॅपसोबत भागिदारी केली. यासाठी पब्लिक अ‍ॅपवर आपले सरकार हा एक विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे.

महाराष्ट्रभरात पब्लिक अ‍ॅपचे असलेले प्रबळ स्थानिक जाळे लक्षात घेता आता सरकारी योजना नागरिकांसाठी अधिक सुलभ, समजायला सोप्या आणि अमलात आणण्याजोग्या होणार आहेत. यामध्ये डिजिटल माहितीसोबत सीएससी केंद्रांच्या माध्यमातून प्रत्यक्ष मदत देखील मिळणार आहे.

‘पब्लिक ॲप’सारख्या हायपर लोकल डिजिटल माध्यमांचा वापर करून शासनाच्या सकारात्मक कामांची प्रभावी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने या माध्यमांचा वापर करण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे, असेही श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पब्लिक अ‍ॅपवर ‘’आपले सरकार'' सुविधेचा नागरिकांना कसा फायदा होईल?

विविध सरकारी विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल.

योजनांची सविस्तर माहिती मराठी भाषेत अगदी सोप्या स्वरूपात उपलब्ध असेल.

नागरिकांना त्यांच्या घराच्या सर्वात जवळ असलेले कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) (सामायिक सेवा केंद्र) शोधता येईल.

नोंदणीसाठी मदत आणि मार्गदर्शनासाठी नागरिक प्रत्‍यक्ष या केंद्रांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकतील.

डिजिटल माहिती आणि प्रत्यक्ष मदत

हा उपक्रम विशेषतः मदत करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्यासाठी फायदेशीर असलेल्या योजना समजून घेता येतील आणि जलद नोंदणीसाठी योग्य केंद्राशी संपर्क साधता येईल.

हा सहयोग पब्लिक अ‍ॅपच्या स्थानिक आणि प्रादेशिक भाषेतील लहान व्हिडिओ प्लॅटफॉर्म असण्याच्या मूळ ताकदीवर आधारित आहे, ज्यामुळे वापरकर्त्याला त्याच्या परिसरातील विश्वासार्ह माहिती मिळते. देशभरात ७०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये १२ भाषांमध्ये २८५ दशलक्ष डाउनलोड्स आणि एकट्या महाराष्ट्रात १९ दशलक्ष व्‍यक्तींपर्यंत पोहोच असलेले पब्लिक अॅप सरकारी योजना नागरिकांच्‍या पर्यंत पोहोचवण्यासाठी एक उत्तम माध्यम ठरत आहे.

हा सहयोग नागरिक-प्रथम डिजिटल प्रशासनाप्रती आणि शेवटच्या घटकापर्यंत कल्याणकारी सेवा पोहोचवण्याच्या सामायिक कटिबद्धतेला सादर करतो, ज्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सरकारी योजना अधिक सुलभ आणि उपयुक्त ठरतील.


शॉपर्स स्टॉपने भारतात आणला बीटीएसचा पाचवा स्टुडिओ अल्बम अरिरांग; चाहत्यांना मिळणार विशेष स्टोअरमधील अनुभव


मुंबई, २६ मे २०२६:
शॉपर्स स्टॉप या भारतातील प्रीमियम फॅशन, सौंदर्य आणि भेटवस्तूंच्‍या गंतव्‍याने जगप्रसिद्ध पॉप बँड बीटीएसचा बहुप्रतिक्षित पाचवा स्टुडिओ अल्बम अरिरांग देशभरात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या दशकातील सर्वात मोठे पुनरागमन मानल्या जाणाऱ्या पॉप जगतातील या दिग्गजांच्या अल्बममुळे जागतिक संगीत विश्वातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण भारतातील चाहत्यांच्या अगदी जवळ आला आहे.

चाहत्यांचा हा आनंद आणखी वाढवण्यासाठी शॉपर्स स्टॉपने स्टोअर्समध्ये विशेष अनुभव कक्ष सुरू केले आहेत. या खास तयार केलेल्या जागांमुळे ग्राहकांना आकर्षक मांडणीत फोटो घेण्याची संधी आणि बीटीएस-प्रेरित उत्‍साहपूर्ण वातावरणाच्‍या माध्‍यमातून या अल्बमचा प्रत्‍यक्ष आणि अनोखा अनुभव घेता येणार आहे.

याबाबत मत व्‍यक्त करत शॉपर्स स्टॉपचे कस्‍टमर केअर असोसिएट, मॅनेजिंग डायरेक्‍टर व सीईओ कवींद्र मिश्रा म्हणाले, “आम्‍ही करणाऱ्या प्रत्‍येक गोष्‍टीमध्‍ये ग्राहकांना प्राधान्‍य देतो. बीटीएसचा अरिरांग अल्बम निवडक शॉपर्स स्टॉप स्टोअर्समध्ये आणणे हा त्याच कटिबद्धतेचा एक भाग आहे, ज्यामुळे चाहत्यांना स्टोअरमध्ये विशेष अनुभव मिळेल. जागतिक संगीत आणि चाहत्यांच्या वाढत्या प्रभावामुळे तरुण ग्राहकांशी अधिक जवळकीने जोडले जाण्याची आणि पारंपारिक खरेदीच्या पलीकडे जाणारे अनुभव देण्याची ही एक उत्तम संधी आहे, असे आम्हाला वाटते.”

संग्रही ठेवण्यासारख्या या अरिरांग अल्बममध्ये सीडी, फोटो कार्ड सेट, फोटो बुक आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे, ज्यामुळे हा अल्‍बम आर्मी आणि संग्राहकांसाठी आवश्यक ठेवा बनला आहे. कोरियन पारंपारिक लोकगीत 'अरिरांग'वरून प्रेरित असलेल्‍या या अल्‍बममध्‍ये बीटीएसची कोरियन मुळे आणि ओळख, भावना व चिकाटी यांसारख्या वैश्विक विषयांचे संयोजन आहे, जो विविध संस्कृती आणि पिढ्यांमध्ये आदराचे स्थान मिळवतो.

या १४ गाण्यांच्या अल्बममधून बीटीएसची कलात्मक प्रगती दिसून येते, ज्यामध्ये ''बॉडी टू बॉडी'' आणि ''हुलिगन'' सारख्या अत्यंत उत्साही गाण्यांपासून ते ''नॉर्मल'' आणि ''इनटू द सन'' सारख्या आत्मपरीक्षण करणाऱ्या गाण्यांचा समावेश आहे. या अल्बममधील मुख्य गाणे ''स्विम'' हे आयुष्यातील आव्हानांचा सामना करत पुढे जाण्याचा आणि चिकाटीचा संदेश देऊन अल्बमला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. 


Thursday, May 7, 2026

शॉपर्स स्टॉपकडून भारतातील पहिल्या ग्लोबल गर्ल ग्रुप ऑडिशनसाठी हायब इंडियासोबत सहयोगाने ‘गेट स्पॉटलाईट रेडी’चे अनावरण


मुंबई, ८ मे २०२६ (Mahasagar Agencies):
शॉपर्स स्‍टॉप या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम फॅशन, ब्युटी आणि गिफ्टिंग डेस्टिनेशनने, मुंबईत इन-स्टोअर ऑडिशन-प्रेरित अनुभव 'गेट स्पॉटलाईट रेडी’सुरू करण्यासाठी हायब इंडियासोबत सहयोग केला. हा सहयोग देशातील पहिल्या जागतिक गर्ल ग्रुप ऑडिशनसाठी भारतातील कलाकारांच्या भावी पिढीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे भारतातील तरूण प्रतिभेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

नवीन पिढीसाठी डिझाइन केलेल्‍या या मोहिमेने शक्तिशाली सांस्कृतिक बदल सादर केले, जिथे जनरेशन झेड आणि जनरेशन अल्फा फक्त प्रेक्षक राहिले नसून जगावर ठसा उमटवण्यासाठी सज्ज असलेले महत्त्वाकांक्षी कलाकार बनले आहेत. १ मे ते ८ मे या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने सौंदर्य, शैली आणि जागतिक पॉप संस्कृतीचे संयोजन सादर केले. याद्वारे ग्राहकांना खास क्युरेटेड आणि अत्यंत गुंतवून ठेवणाऱ्या क्रियाकलापांच्‍या माध्यमातून स्पॉटलाईटसाठी (प्रसिद्धीसाठी) सज्ज होण्याची संधी मिळाली.

हायब इंडियाच्या जागतिक गर्ल ग्रुप ऑडिशनबद्दल असलेल्या वाढत्या उत्साहात या अनुभवाने अधिक भर घातली. ३१ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत ऑनलाइन चालणाऱ्या या ऑडिशन्स भारतातील उदयोन्मुख आणि महत्त्वाकांक्षी तरुण प्रतिभेला वाव देत आहेत. तसेच, ९ आणि १० मे रोजी मुंबईत होणाऱ्या ऑन-ग्राउंड ऑडिशन्स आणि हायब इंडिया पॉप-अप पार्क्समुळे हा उत्साह अधिक वाढला आहे, जिथे परस्परसंवादी अनुभव आणि कंपनीच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण व निर्मिती परिसंस्थेत प्रवेश करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

"शॉपर्स स्टॉपने हायब इंडियासोबत सहयोगाने आपल्या देशव्यापी 'गेट स्पॉटलाईट रेडी' मोहिमेची घोषणा केली आहे," असे शॉपर्स स्टॉपचे कस्टमर केअर असोसिएट, मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि सीईओ कविंद्र मिश्रा म्हणाले. "दशकांपासून शॉपर्स स्टॉपने आघाडीच्या जागतिक ब्रँड्सना भारतातील ग्राहकांच्या जवळ आणण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. 'गेट स्पॉटलाईट रेडी' मोहिमेद्वारे हा ब्रँड आपला प्रवास पुढे नेत असून, आता भारतातील प्रतिभेला जागतिक स्तरावर चमकण्यास सक्षम करत आहे. भारतासाठी जागतिक अनुभव सादर करण्यापासून भारतातील प्रतिभेला जागतिक व्यासपीठावर नेण्यापर्यंतचा हा ब्रँडच्या उद्देशातील महत्त्वाचा बदल आहे."

शॉपर्स स्टॉपसोबत आमचा सहयोग उत्साही पाऊल आहे, कारण याद्वारे आम्ही भारतातील समृद्ध आणि गतिमान मनोरंजन परिसंस्थेप्रती असलेली आमची बांधिलकी अधिक दृढ करत आहोत," असे हायब इंडियाचे बिझनेस डेव्हलपमेंट हेड सार्थक अरोरा म्हणाले. "शॉपर्स स्टॉपसोबत ‘गेट स्पॉटलाईट रेडी’ मोहीम जागतिक स्तरावर चमकू शकणाऱ्या कलाकारांचा शोध घेण्याच्या, त्यांना जोपासण्याच्या आणि विकसित करण्याच्या आमच्या प्रयत्‍नांचाच भाग आहे. आम्ही चाहत्यांसाठी आणि समुदायांसाठी अशाच प्रकारचे गतिमान व आकर्षक अनुभव निर्माण करण्यास उत्सुक आहोत, जे त्यांच्या महत्त्वाकांक्षांना पाठबळ देतील आणि चिरंतन आठवणी तयार करतील."

या मोहिमेच्या मुंबई टप्प्याचा एक भाग म्हणून, W.i.S.H. या सर्व मुलींच्या पॉप बँडने ७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता जुहू येथील शॉपर्स स्टॉपमध्ये सादरीकरण केले. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना उत्‍साहवर्धक अनुभव दिला आणि तरुण महत्त्वाकांक्षी कलाकारांना त्यांची स्वप्‍ने पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले.

शॉपर्स स्टॉपने महत्त्वाकांक्षी कलाकारांना 'गेट स्पॉटलाईट रेडी' करण्यासाठी सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध करून दिले, ज्यामध्ये तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शैली, कौशल्य आणि स्व-अभिव्यक्तीचे संयोजन होते. सहभागी कलाकारांनी पाच खास क्युरेटेड फॅशन आणि ब्युटी लुक्सचा अनुभव घेतला, कलर अॅनालिसिस झोनमध्ये स्वतःला साजेसे रंग शोधले आणि एका परस्परसंवादी व उत्साही फोटोबूथमध्ये आपली बदललेली शैली कॅमेऱ्यात कॅप्‍चर केली.

यातील प्रत्येक अनुभव फक्त सहभागींच्या बाह्य रूपाला उजाळा देण्यासाठीच नाही, तर त्यांचा आत्मविश्वास वाढवून सादरीकरण सुधारण्यासाठी डिझाइन केला होता. शॉपर्स स्टॉपची ही मोहीम म्हणजे महत्त्वाकांक्षी कलाकारांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी दिलेले एक निमंत्रण होते.

================================================================

Thursday, April 23, 2026

“वालकेश्वर जैन मंदिर पाडकामावर उच्च न्यायालयाची स्थगिती -भाविकांचा तीव्र विरोध; बीएमसीला कडक शब्दांत सुनावणी ”


मुंबई, महासागर, समाचार एजेंसी: 
गुरुवार, १६ एप्रिल २०२६ रोजी बीएमसी ने नोटीस देऊन मुंबईतील वालकेश्वर येथे स्थित श्री भेरूलालजी कोठारी रिलिजियस ट्रस्ट संचालित महावीर स्वामी जिनालय – चंदनबाला देरासर याला बेकायदेशीर असल्याचे सांगून पाडण्याची कारवाई करण्याचे ठरवले होते.

या कारवाईच्या विरोधात हजारो भाविक देरासर परिसरात जमले आणि तप, जप व मंत्रोच्चार करून धार्मिक साधना सुरू केली.

संघातील श्रावक-श्राविका, आचार्य भगवंत, साधक, तसेच श्री भेरूलालजी कोठारी रिलिजियस ट्रस्टचे विश्वस्त आणि संघाचे नेते यांच्या अथक प्रयत्नांमुळे बीएमसी च्या ०८.०४.२०२६ च्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात इंटरिम अर्ज (अपील क्रमांक १०९२०/२०२६) दाखल करण्यात आला.

उच्च न्यायालयात मा. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने BMC ला कडक शब्दांत सुनावणी करत चंदनबाला देरासर पाडण्याच्या कारवाईवर स्थगिती आदेश दिला.

२०१८ मध्ये काही सोसायटी सदस्यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्राद्वारे श्री भूपेश राठोड यांना फक्त बेसमेंटमधील अग्निसुरक्षेच्या मुद्द्यावर कोर्टात केस दाखल करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, कोर्टात सादर केलेल्या अर्जात अनेक इतर तक्रारींचा समावेश करण्यात आला आहे.

ट्रस्टविरुद्ध दाखल रिट याचिका क्र. १२२३/२०१८ अंतर्गत कोर्ट अर्ज क्र. CONPW (L)/११०१३/२०२६ मध्ये अर्जदार (श्री भूपेश राठोड) यांनी ट्रस्टी आणि मॅनेजर/सुपरवायझर यांना ६ महिन्यांची शिक्षा व आर्थिक दंड लावण्याची मागणी केली आहे. तसेच बेसमेंटचा ताबा घेण्यासाठी कोर्ट रिसिव्हर नेमण्याची मागणी करत अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

याच्या विरोधात सोसायटीतील इतर सदस्यांनी इंटरिम अर्ज दाखल केला असून त्याची सुनावणी २९.०४.२०२६ रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. या अर्जात श्री भूपेश राठोड यांना दिलेली परवानगी फक्त अग्निसुरक्षा विषयापुरती मर्यादित ठेवावी आणि इतर मागण्या फेटाळाव्यात अशी विनंती करण्यात आली आहे.

देरासर पाडण्याच्या कारवाईच्या विरोधात इंटरिम अर्ज दाखल करणाऱ्या सदस्यांना व्यवस्थापन समितीतील काही सदस्यांकडून धमक्या देण्यात येत असून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

ट्रस्टचे स्वयंपाकघर गेल्या ७–८ वर्षांपासून बंद आहे. बेसमेंटच्या शेजारील तात्पुरत्या शेडचा वापर फक्त साधू-साध्वींना उकळलेले पाणी देण्यासाठी केला जातो. बेसमेंटमध्ये इतर कोणतीही क्रिया होत नाही, फक्त दररोज सुमारे २ तास प्रवचन आयोजित केले जाते.

तरीही आयंबिल ओली/अनुष्ठानानंतर प्रवचन बंद करण्यासाठी काही समिती सदस्यांनी विरोध दर्शवला आहे. जैन धर्म हा नेहमीच शांतताप्रिय धर्म मानला जातो, तर मग जैन श्रावक अशा त्रासाला समर्थन का देत आहेत?

Thursday, April 2, 2026

आयंबिल ओलीसाठी महाराष्ट्र सरकारचा हातभार! जैन समाजाने मानले सरकारचे आभार; आयंबिल ओलीमुळे 60–70% गॅस बचत


मुंबई, (महासागर वृत संस्था):
संपूर्ण भारतात दरवर्षी हजारोंच्या संख्येने जैन संप्रदायामार्फत आयंबिल ओलीचे आयोजन केले जाते. या पवित्र प्रसंगी जैन समाजासाठी पुरेशा प्रमाणात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देत आमच्या धार्मिक विधींचे सुरळीतपणे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे. याबद्दल संपूर्ण जैन समाज महाराष्ट्र राज्य सरकारचा अत्यंत आभारी आहे. अलीकडे निर्माण झालेल्या जिओ-पॉलिटिकल परिस्थितीमुळे एलपीजी गॅस (LPG GAS) संदर्भात जी समस्या निर्माण झाली होती, तिच्या निराकरणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने उचललेली तात्काळ आणि कौतुकास्पद पावले याबद्दल आम्ही संपूर्ण जैन समाजाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

जैन धर्मात आयंबिल ओली हा अतिशय कठोर आणि शिस्तबद्ध तप (उपवास साधना) मानला जातो. आयंबिल ओलीच्या नियमांनुसार दिवसभरात फक्त एकदाच भोजन (एकासन) केले जाते. या भोजनात तेल, तूप, मसाले आणि फोडणी नसलेले, उकडलेले, साधे आणि कमी शिजवलेले अन्न घेतले जाते. अनेकजण कच्चे किंवा हलके उकडलेले अन्नही ग्रहण करतात. आयंबिल ओलीतील अन्न बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असते.

सामान्य दिवसांमध्ये गॅस (LPG) चा वापर जास्त प्रमाणात होतो, कारण दिवसातून २–३ वेळा स्वयंपाक केला जातो. फोडणी, तळणे, पोळी, भाजी इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि गॅस जास्त वेळ पेटलेला राहतो. परंतु आयंबिल तपामध्ये फक्त एकदाच अन्न बनवल्यामुळे सुमारे ६०–७०% गॅसची बचत होते. साधारणतः एक गॅस सिलिंडर ३० दिवस चालतो, तर आयंबिल काळात तोच सिलिंडर ४५–६० दिवसांपर्यंत चालू शकतो.

अनेक घरांमध्ये सामूहिक आयंबिल (एकत्र भोजन) केले जाते, ज्यामुळे कमी भांडी वापरली जातात आणि कमी स्वयंपाक केल्यामुळे गॅसची आणखी बचत होते. आयंबिल ओलीमध्ये साधे आणि कमी शिजवलेले अन्न असल्याने गॅस जळण्याचा वेळही कमी असतो. या संपूर्ण आयंबिल अनुष्ठानात हजारोंच्या संख्येने गॅस सिलिंडरची बचत झाली आहे, जी जैन समाजासाठी अभिमानाची बाब आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे संपूर्ण जैन समाजात सकारात्मक संदेश गेला आहे आणि लोकांचा सरकारवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Monday, March 23, 2026

जैनाचार्य श्री योगतिलकसूरिजी की वाणी के प्रभाव से हुई ऐतिहासिक 64 दीक्षाओं का लोकभवन में अभिवादन

Honorable Vice President, Governor, Chief Minister Maharashtra and Trustee of Adhyatm Parivar, Shri Hiteshbhai Mot

मुंबई, २३ मार्च २०२६ (महासागर वृत्त संस्था): दीक्षा धर्म के महानायक, जगप्रसिद्ध जैनाचार्य श्रीमद् विजय योगतिलकसूरीश्वरजी महाराज की वैराग्यमयी वाणी के प्रभाव से गत माघ वद 7, दिनांक 8-2-2026 को मुंबई, महाराष्ट्र की धरती पर सदियों में पहली बार एक ही स्थान पर, एक ही मंडप में 64 दीक्षाएँ सम्पन्न हुईं।

जैन शासन की आधारशिला समान इस दीक्षा धर्म के अभिनंदन हेतु चैत्र सुद 3, दिनांक 21-3-2026 को मालाबार हिल स्थित लोकभवन में भारत के उपराष्ट्रपति श्री सी.पी. राधाकृष्णन, राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, कैबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढ़ा आदि की उपस्थिति में भव्य आयोजन किया गया। इस अवसर पर उपरोक्त सभी गणमान्य व्यक्तियों द्वारा भगवान महावीर द्वारा दर्शाए गए निष्पाप जीवन एवं दीक्षा जीवन की मुक्त कंठ से सराहना की गई।

इस आयोजन के अंतर्गत लोकभवन में प्रसिद्ध जैन संस्था ‘अध्यात्म परिवार’ द्वारा विभिन्न प्रदर्शनों का आयोजन किया गया, जिसे उपराष्ट्रपति सहित सभी मंत्रियों ने सराहा।

आनंद में वृद्धि करते हुए वैशाख सुद 9, दिनांक 11-5-2026 को लोनावला में ‘सूरियोग’ की निश्रा में, जो मुमुक्षु रत्न श्री सुव्रत कुमार युवावस्था में दीक्षा ग्रहण करने वाले हैं, उनका भी उपराष्ट्रपति आदि द्वारा सम्मान किया गया।

साथ ही 64 दीक्षा महोत्सव के अंतर्गत अध्यात्म परिवार द्वारा चल रही जैन शासन की सेवा एवं सुरक्षा हेतु निधि में जिन्होंने उदारतापूर्वक योगदान दिया था, उन सभी महानुभावों का भी उपराष्ट्रपति आदि द्वारा सम्मान किया गया।

जैन शासन के अनेक अग्रणी, ट्रस्टीगण एवं सेवाभावी जन इस ऐतिहासिक एवं यादगार अवसर के साक्षी बने। कार्यक्रम के समापन के पश्चात सभी को आदरपूर्वक बैठाकर साधर्मिक भक्ति के साथ सम्मानित किया गया।

Thursday, March 5, 2026

'ग्लांझमान थ्रोम्बास्थेनिया' शी झुंजणाऱ्या ३७ वर्षीय महिलेला मिळाले नवजीवन


दुर्मिळ रक्तस्त्राव विकाराने ग्रस्त महिलेवर यशस्वी रोबोटिक हिस्टेरेक्टॉमी

नवी मुंबई, ५ मार्च २०२६ (महासागर वृत्त संस्था): ३७ वर्षीय नीलम यांच्यासाठी गेली अनेक वर्षे प्रत्येक महिना एका 'मेडिकल इमर्जन्सी' सारखाच असे. एका दुर्मिळ आणि जीवघेण्या रक्तविकारामुळे मासिक पाळीदरम्यान होणारा अतिरक्तस्त्राव रोखण्यासाठी त्यांना दरमहा रक्त चढवावे लागत असे; ज्यामुळे त्यांचे आयुष्य रुग्णालय आणि उपचारांच्या चक्रात अडकले होते.अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या डॉक्टरांनी यशस्वी रोबोटिक हिस्टेरेक्टॉमी करून रुग्ण महिलेला नवे आयुष्य मिळवून दिले. सतत किंवा असामान्यपणे होणारा अति-रक्तस्त्राव गांभीर्याने घ्यायला हवा आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी केलेली तपासणी आणि तज्ञांचे मार्गदर्शन जीवघेणी गुंतागुंत रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.

रुग्ण 'ग्लांझमान्स थ्रोम्बास्थेनिया' या अत्यंत दुर्मिळ जन्मजात आजाराने ग्रस्त होती. यामध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या सामान्य दिसते, परंतु त्या आपले कार्य योग्यरित्या करू शकत नाहीत. परिणामी, रक्ताची गुठळी तयार होत नाही आणि साध्या जखमेमुळे देखील अनियंत्रित आणि जीवघेणा रक्तस्त्राव होण्याचा धोका निर्माण होतो. नीलम यांच्यासाठी हा आजार एक असे दुष्टचक्र बनले होते, ज्यात दर महिन्याला रुग्णालय आणि रक्त चढवणे अटळ होते. अलीकडेच जेव्हा त्यांना अपोलो हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आले, तेव्हा त्यांचे हिमोग्लोबिन कमी होऊन अवघे ४ g/dL उरले होते ही स्थिती प्राणघातक ठरू शकली असती. त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी त्यांना वारंवार रक्त द्यावे लागले. याच कठीण काळात त्यांनी या समस्येचा कायमचा निकाल लावण्यासाठी 'हिस्टेरेक्टॉमी' (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया) करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

'ग्लांझमान्स थ्रोम्बास्थेनिया' असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया करणे अत्यंत धोकादायक असते, कारण अशा वेळी रक्तस्त्राव थांबवणे जवळजवळ अशक्य असते. हा धोका कमी करण्यासाठी वैद्यकीय पथकाने रोबोटिक हिस्टेरेक्टॉमी करण्याचा निर्णय घेतला. ही एक आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आहे, शस्त्रक्रियेतील अचूकता आणि नगण्य रक्तस्त्राव ही याची वैशिष्ट्ये आहेत. ही रोबोटिक हिस्टेरेक्टॉमी जवळजवळ शून्य रक्तस्त्रावासह यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आणि संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान रक्त चढवण्याची गरजही भासली नाही. इतक्या उच्च-जोखमीच्या प्रकरणात हे एक असाधारण यश आहे. भारतातील 'अत्यंत धोकादायक' शस्त्रक्रियांच्या व्यवस्थापनात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. 

अत्यंत जटिल आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया तज्ञांच्या  एका संयुक्त पथकाने यशस्वी केली, ज्याचे नेतृत्व डॉ. तृप्ति दुबे, सीनियर कन्सल्टंट - प्रसूती, स्त्रीरोग आणि रोबोटिक सर्जरी यांनी केले. या ऐतिहासिक यशामध्ये त्यांना डॉ. पुनीत जैन, कन्सल्टंट - हीमेटोलॉजी आणि हीमेटो-ऑन्कोलॉजी तसेच प्रोग्राम को-ऑर्डिनेटर, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि CAR T-सेल थेरपी यांचे विशेष सहकार्य लाभले. शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली आणि विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रक्त चढवण्याची अजिबात गरज भासली नाही. रुग्णाची गंभीर प्रकृती पाहता हा परिणाम खरोखरच असाधारण आहे. शस्त्रक्रियेनंतर, प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी खबरदारी म्हणून रक्त चढवण्यात आले आणि कोणत्याही गुंतागुंतीशिवाय रुग्णाच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली.

डॉ.तृप्ति दुबे, सीनियर कन्सल्टंट-प्रसूती, स्त्रीरोग आणि रोबोटिक सर्जरी, म्हणाल्या,“ग्लांझमान्स थ्रोम्बास्थेनिया असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे अत्यंत आव्हानात्मक असते, कारण शस्त्रक्रियेदरम्यान उचललेले एक छोटेसे पाऊलही अनियंत्रित रक्तस्त्राव सुरू करू शकते. शस्त्रक्रियेच्या तंत्रापासून ते ब्लड प्रॉडक्ट्स देण्याच्या वेळेपर्यंत, प्रत्येक टप्प्याचे अतिशय सूक्ष्म नियोजन करावे लागले. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे आम्हाला असाधारण अचूकतेसह ऑपरेशन करण्यात आणि रक्ताचा अपव्यय कमीत कमी ठेवण्यात यश आले. रुग्ण महिलेला सहा दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रुग्णालयात असतानाच त्यांनी त्यांच्या ऑफिसचे काम पुन्हा सुरू केले. हे प्रकरण सिद्ध करते की, रोबोटिक शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतही सकारात्मक परिणाम देऊ शकते आणि रुग्णांना अपेक्षेपेक्षा कितीतरी लवकर सामान्य जीवनात परतण्यास मदत करते.”