Tuesday, July 8, 2025

'गायत्री-एआय'च्या भारतातील पहिल्या 'एआय'आधारित 'वेलनेस सेंटर'चे उद्घाटन


मुंबई,८ जुलै, २०२५ (महासागर): 
 भारताच्या वेलनेस क्षेत्रासाठी एका  ऐतिहासिक पर्वणी ठरलेल्या 'गायत्रीएआय'ने सोमवार जुलै रोजी मुंबईतील अंधेरी येथे त्यांचे 'एआयआधारित क्वांटम वेलनेस सेंटर सुरू केले'क्वालिमाइंड्स कॉर्प सर्व्हिसेस लिमिटेड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओआणि व्यवस्थापकीय संचालक (एमडीआणि फार्मा उद्योगातील एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक श्रीकेआनंद वेंकट रावतसेच बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटी पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत क्वांटम वेलनेस सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पडलाया कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतात अतिशय सुलभ आणि एआय आधारित सकल रोगनिवारक उपचार पद्धतीच्या (थेरपीएका नवीन युगाची सुरुवात झाली आहे.

नव्याने उद्घाटन झालेल्या केंद्रात एनएलएस बायोरेसोनन्स ४डी निदानोपयोगी औषधेमुक्त आरोग्य पुनर्वसन उपकरण मेटाट्रॉन मेटापॅथियामेटाट्रॉन झेड १०० प्लाझ्माहील एक्स४नारिया चेअर (टेस्लाटेकपेक्षाही श्रेष्ठ)स्केलर ३६० क्यूआय कॉइल™️झेड-१०० क्वांटम बायो-स्टिम्युलेटर आणि प्रगत हायड्रो-कोलन उपचार प्रणाली यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहेहे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे समर्थित असलेल्या उपचारात्मक कल्याण मापदंडाद्वारे एकत्रित केले आहेतजे वैयक्तिक आणि भविष्यसूचक उपचार प्रदान करतात.



'
गायत्रीएआय'मध्ये आम्ही प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आरोग्याची निरंतर जबाबदारी घेण्यास सक्षम बनवण्यावर विश्वास ठेवतो," असे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीधर्मप्रकाश त्रिपाठी म्हणाले. 'जिथे मानवी कौशल्यांद्वारे वैज्ञानिक कल्पकतेची जोड देऊन महत्त्वपूर्ण आणि आवश्यक उपचार दिले जातातअशा दृष्टिकोनाचे 'गायत्री एआयहे एक प्रतीक आहेअसेही त्यांनी सांगितले'गायत्री-एआय'च्या संस्थापक श्रीमती शोभना डीपी त्रिपाठी म्हणाल्या, 'सुदृध आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभावअसे नाही - तर ते संतुलनजीवनशक्ती आणि उद्देश आदींचा सहवास असते', असे 'गायत्री एआय'च्या संस्थापक शोभना डीपी त्रिपाठी म्हणाल्या'आमची परिसंस्था तंत्रज्ञानअंत:स्फूर्ती आणि करुणा यांना एकत्रित करून त्या प्रवासाला अर्थपूर्णपणे सहकार्य करते', असेही त्यांनी पुढे नमूद केले.

क्वालिमाइंड्स कॉर्प सर्व्हिसेसचे एमडी आणि सीईओडॉरेड्डीज लॅबोरेटरीजचे माजी उपाध्यक्षलुपिनचे माजी अध्यक्षग्लेनमार्कचे माजी अध्यक्षकॅडिला (झायडीजचे माजी उपाध्यक्ष आणि जागतिक प्रमुख आणि 'निकोलस पिरामल'चे माजी उपाध्यक्ष श्रीकेआनंद वेंकट राव उद्घाटन सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होतेउद्घाटनप्रसंगी ते म्हणाले, 'भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पारंपरिक आरोग्य मूल्यांना कसे सक्षम बनवता येते याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे गायत्री-एआय आहे'. हे केंद्र संपूर्ण भारतात आरोग्य सक्षमीकरणाच्या चळवळीला प्रेरणा देईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अग्रगण्य वेलनेस केंद्राच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला चार चांद लावण्यासाठी ईशा कोपीकर आणि निहारिका रायजादा सेलिब्रिटी उपस्थित होत्याया सर्वांच्या चमकदार उपस्थितीने हा उद्घाटन सोहळा अधिकच उजळून निघालाउपस्थित मान्यवरांना एनएलएस बायोरेसोनन्सक्यूआय कॉइल™️ स्केलर उपचारप्लाझ्माहील एक्स४एचएचओ इनहेलेशन आणि प्रगत हायड्रो-कोलन उपचार प्रणालीसारख्या वैशिष्ट्यीकृत उपचारांचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेतसेच केंद्रातील अत्याधुनिक सुविधांचा  धावता आढावा घेऊनसंस्थापकवैद्यकीय सल्लागार आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्यात आला.

Friday, July 4, 2025

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) तर्फे ‘चॅम्पियन्स ऑफ आकाश’ कार्यक्रमात NEET आणि JEE Advanced 2025 टॉपर्सचा मुंबईत गौरव


आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) तर्फे 'प्रॉब्लेम सॉल्वर'ची भावना साजरी करत, गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसाने सन्मानित

आकाश विद्यार्थ्यांमध्ये ‘प्रॉब्लेम सॉल्विंग’ची कला विकसित करतो – जिच्या जोरावर विद्यार्थी कोणत्याही अडचणीत शांत, लक्ष केंद्रीत व उपायशोधक राहतात. यंदाच्या परीक्षांमधील बदलांनाही त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे गेले.

आकाशियन विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की, जेव्हा ‘प्रॉब्लेम सॉल्विंग’ स्कील आत्मसात होते, तेव्हा कोणतीही परीक्षा यशस्वीरित्या पार करता येते.

मुंबई, ४ जुलै २०२५ (महासागर/ जागृत भानुशाली): भारतातील आघाडीची टेस्ट प्रिपरेशन संस्था, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत विद्यार्थ्यांना आव्हानांवर मात करून यशस्वी होण्यासाठी सक्षम केलं आहे. NEET UG 2025 आणि JEE Mains व Advanced 2025 या परीक्षांच्या स्वरूपात झालेल्या बदलांमुळे पेपर अधिक कठीण झाला असतानाही, आकाशच्या विद्यार्थ्यांनी देशभर आणि राज्यभरातून दमदार कामगिरी करत आपल्या संस्थेची गुणवत्ता अधोरेखित केली आहे.

NEET UG 2025 मध्ये आकाशच्या विद्यार्थ्यांनी टॉप 10 मध्ये तब्बल ५ रँक मिळवल्या — AIR 2, 3, 5, 9 आणि 10. टॉप 100 मध्ये एकूण ३५ विद्यार्थी आकाशचे असून, ११ राज्य टॉपर्स आकाशमधून घडले आहेत. हे टॉपर्स मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दादरा आणि नगर हवेली, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, गोवा आणि दमण-दीव या राज्यांतील आहेत.

JEE Advanced 2025 मध्येही आकाशच्या विद्यार्थ्यांनी आपली ताकद दाखवली असून, टॉप 100 मध्ये ७ आणि टॉप 200 मध्ये १४ विद्यार्थी स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. यामुळे मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोन्ही शाखांमध्ये AESL ची शैक्षणिक परंपरा अधिकच भक्कम झाली आहे.

"आकाशमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं कौशल्य शिकवतो," असं आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे एमडी आणि सीईओ दीपक मेहता म्हणाले. "म्हणूनच यंदाही आमच्याकडे इतके टॉप रँकर्स आहेत. NEET 2025 चं स्वरूप वेगळं तर होतंच, पण ते कठीणही होतं. पण नवं फॉर्मॅट असो किंवा नवी आव्हानं – आकाशियननी पुन्हा एकदा सिद्ध केलं की, जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग शिकता, तेव्हा कुठलाही टेस्ट crack करणं शक्य होतं."

नीट यूजी 2025 मध्ये मुंबईतील आकाश इन्स्टिट्यूटचे झळाळते यश!

नीट यूजी 2025 मध्ये आकाश इन्स्टिट्यूट, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी अफाट यश मिळवलं आहे. महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावणारा कृशांग जोशी (AIR 3) हा या यशाचा सर्वोत्तम दाखला आहे. त्याचबरोबर आरव अग्रवाल (AIR 10), इश्मीत कौर (AIR 85) आणि प्रखर मेहरोत्रा (AIR 195) यांनीही देशपातळीवर उत्कृष्ट रँक मिळवत आपली चमक दाखवून दिली.

इतर उल्लेखनीय गुणवंतांमध्ये अनिरुद्ध भूमा कन्नन (AIR 218), दक्ष पटेल (AIR 338), अपूर्वा प्रशांत कपाडे (AIR 382), अनन्या मेहता (AIR 427), मंथन जोशी (AIR 602) आणि अमितेश कुमार (AIR 752) यांचा समावेश आहे.

JEE Advanced 2025 मध्ये ‘आकाश’च्या टॉपर्सचा गौरव – निखिल AIR 986, यश शर्मा AIR 1050, अर्जुन शर्मा AIR 1989, लक्ष्य AIR 1661, आणि जायथी AIR 2088

‘आकाश’च्या विविध केंद्रांतील जेईई अ‍ॅडव्हान्स्ड 2025 टॉपर्सचा आज Champions of Aakash या विशेष कार्यक्रमात एईएसएल (AESL) तर्फे सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवून केवळ स्वतःचा गौरवच नाही तर आपल्या शहराचा आणि राज्याचा सुद्धा सन्मान वाढवला आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये निखिल (AIR 986), यश शर्मा (AIR 1050), अर्जुन शर्मा (AIR 1989), लक्ष्य (AIR 1661), आणि जायथी (AIR 2088) यांचा समावेश आहे. त्यांच्या यशामागे योग्य दिशा, सक्षम मार्गदर्शन, आणि चिकाटीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

कार्यक्रमात बोलताना डॉ. एच. आर. राव, चीफ अकॅडमिक आणि बिझनेस हेड, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) यांनी सांगितले, "आमच्या विद्यार्थ्यांचे यश हे AESL साठी अत्यंत अभिमानाचे आणि प्रेरणादायी क्षण आहे. आकाशमध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला समस्यांचे समाधान शोधणारा, नव्या आव्हानांसमोर शांत आणि केंद्रित राहणारा, आणि नेहमी उपायकेंद्रित दृष्टिकोन ठेवणारा बनवण्यावर भर देतो – अगदी यंदाच्या परीक्षांमधील बदलांसारख्या अनपेक्षित गोष्टींच्या पार्श्वभूमीवरदेखील. आमचे सातत्यपूर्ण निकाल हे आमच्या मजबूत शैक्षणिक पायाभूत रचनेचे, वैयक्तिक मार्गदर्शनाचे आणि भविष्यासाठी सक्षम विद्यार्थी घडवण्याच्या आमच्या कटिबद्धतेचे प्रतिबिंब आहेत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे, विशेषतः यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, ज्यांनी आम्हाला अभिमान वाटावा असे यश मिळवून दिले."

टॉपर्सनी विद्यार्थ्यांना NEETसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक प्रभावीपणे कशी करता येईल, याबद्दल उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी वेळ व्यवस्थापन आणि तणावावर नियंत्रण ठेवण्याचे काही प्रभावी उपायही शेअर केले.

विद्यार्थ्यांना टॉपर्सच्या शैक्षणिक प्रवासाची थेट माहिती मिळाली, ज्यातून त्यांना प्रेरणा घेता आली. अभ्यासाच्या काळात वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, अडचणींवर मात कशी करावी, प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येतील आणि आकाश संस्थेच्या मदतीने आपल्या करिअरच्या उद्दिष्टांकडे कसे वाटचाल करता येईल – यावर सखोल चर्चा झाली.

या संवादात्मक सत्रात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या शंका समजून घेऊन त्यांचे समाधान करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपले अनेक प्रश्न स्पष्ट करता आले

Wednesday, June 25, 2025

कर्करोगाला मात दिलेल्यांसाठी कॅन्सर सेंटर (एसीसी) चा 'कॅन विन' सदैव सोबत


अपोलो कॅन्सर सेंटर (एसीसी) चा 'कॅन विन' सपोर्ट ग्रुप कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासात सर्वांना एकत्र जोडतो

नवी मुंबई, २५ जून २०२५ (महासागर): राष्ट्रीय कॅन्सर सर्व्हायव्हर्स महिन्याचे औचित्य साधून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, अपोलो कॅन्सर सेंटर (एसीसी) ने 'कॅन विन' सुरु करण्याची घोषणा आज केली.  एक कर्करोग समर्थन ग्रुप जो कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासात असलेल्या सर्वांना एकत्र जोडतो. 'सामायिक शक्ती जीवन बदलू शकते' या विश्वासावर आधारित 'कॅन विन' समूह कोणत्याही एका ब्रँडपुरता मर्यादित नाही. या मंचावर ऑन्कोलॉजिस्ट, सायको-ऑन्कोलॉजिस्ट, रुग्ण, कर्करोगातून वाचलेल्या व्यक्ती, रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती आणि स्वयंसेवकांना एकत्र आणले जाते. सहानुभूती, समर्थन आणि सामायिक भावनेतून काम करणारा एक दयाळू समुदाय तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा फक्त एक समूह नाही तर बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी, शिकण्यासाठी आणि बरे होण्यासाठी एक सुरक्षित जागा आहे. आजाराचे नुकतेच निदान झाले असेल, उपचार घेत असाल किंवा दुसऱ्या कोणाची काळजी घेत असाल किंवा कर्करोगानंतरचे आयुष्य जगत असाल, तर  'कॅन विन' तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एकटे नाही आहात.

'कॅन विन' हे दोन प्रभावी संकल्पनांचे प्रतिनिधित्व करते: कर्करोगात एक 'कॅन' आहे जे ताकद आणि शक्यतांची आठवण करून देते. 'विन' हे फक्त ध्येय नाही तर एक मानसिकता आहे धैर्य, निर्भीडपणा आणि दृढनिश्चयाने पुढे जाण्याचा निर्णय आहे. या उपक्रमाची सुरुवात एका सत्राने झाली, ज्यामध्ये कर्करोगातून वाचलेल्यांनी त्यांच्या भावनिक कहाण्या सांगितल्या. प्रत्येक कहाणी वैयक्तिक धैर्य, ताकद आणि विजयाने भरलेली होती. या वास्तविक जीवनातील कथा त्याच मार्गावर चालणाऱ्या इतरांसाठी आशेचा किरण बनत आहेत.

आपल्या मुलाची कहाणी सांगताना, पनवेल येथील ११ वर्षांच्या मास्टर जयेशचे वडील म्हणाले,“आमच्या मुलाला हा आजार झाला तेव्हा इतका लहान होता की त्याला कर्करोग समजणे अशक्य होते. त्याची एकमेव इच्छा होती की त्याने त्याची सामान्य काम पुन्हा सुरू करावीत, मित्रांसोबत खेळावे, शाळेत जावे. डॉक्टरांनी आम्हाला खूप मदत केली. आम्ही निराश झालो असलो तरी, आम्ही त्याला कधीही आशा सोडू दिली नाही. आमच्या मुलाला अनेक उपचार घ्यावे लागले, जे कधीकधी खूप आव्हानात्मक होते. त्याचे वय लहान होते, पण लढाई मोठी होती आणि तो जिंकला. आता, त्याला तो कठीण काळ आठवत नाही आणि तो फक्त जगू, हसू इच्छितो आणि मोठा होऊ इच्छितो. त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे सामान्य जीवन जगण्यासाठी आम्ही त्याला शक्य तितका पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतो.”

पनवेल येथील अवघ्या ६ वर्षांच्या अभिद्याचे वडील म्हणाले,"आमची लहानगी लेक अजूनही कर्करोगाशी खूप धैर्याने लढत आहे. तिला दोनदा कर्करोगाचे निदान झाले आहे परंतु आमच्या डॉक्टरांमुळे आणि इतरांच्या पाठिंब्यामुळे ती आशावादी आहे आणि तिच्या वयाच्या इतर मुलींप्रमाणेच सर्वकाही करू इच्छिते. आमच्या कुटुंबासाठी हा खूप कठीण आणि आव्हानात्मक काळ आहे परंतु आम्ही तिला सर्वोत्तम काळजी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आम्हाला तिच्या भविष्याबद्दल खूप काळजी आहे आणि आशा आहे की लोक आमच्या मुलांना समजूतदारपणे वागवतील ज्यांनी त्यांच्या छोट्या आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे."

अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ लिमिटेडच्या ग्रुप ऑन्कोलॉजी अँड इंटरनॅशनलचे अध्यक्ष श्री.दिनेश माधवन म्हणाले,“कर्करोगाविरुद्धची लढाई ही केवळ प्रगत उपचारांपुरती मर्यादित नाही तर ती भावनिक लवचिकता आणि मानवी संबंधांबद्दल देखील आहे. 'कॅन विन'  सारख्या उपक्रमांमुळे कर्करोगातून वाचलेल्यांना एक व्यासपीठ मिळते जिथे ते त्यांचे विचार शेअर करू शकतात, त्यांच्यासारखे जगणाऱ्या इतरांना पाहू शकतात आणि डॉक्टर, काळजी घेणाऱ्यांच्या साथीने एकत्र बरे होऊ शकतात. हा उपक्रम कर्करोगाविरुद्धच्या लढाईतील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करतो. जर सहानुभूती असेल तर कथाकथन एक उपचारात्मक साधन बनते - वक्ता आणि श्रोता दोघांनाही सक्षम बनवते. काळजीच्या अधिक समग्र मॉडेलकडे वाटचाल करत असताना, आम्ही एक अशी इकोसिस्टिम तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत जिथे विज्ञान आणि मानवता हातात हात घालून काम करतात आणि 'कॅन विन' त्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.”

Wednesday, June 18, 2025

गोवा पर्यटन २४ जून २०२५ रोजी भव्य शिवोली बोट महोत्सवात सांजाव करणार साजरा



शिवोली, १८ जून २०२५ (महासागर)   –
 गोवा सरकारच्या पर्यटन खात्याला, शिवोली सांजाव पारंपारिक बोट महोत्सव आणि सांस्कृतिक संघटनेच्या सहकार्याने २४ जून २०२५ रोजी शिवोलीत सांजाव २०२५ साजरा करण्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हा बहुप्रतिक्षित सांस्कृतिक उत्सव शिवोली या चैतन्यशील नदीकाठच्या गावात सेंट अँथनी चर्चसमोर होणार असून तो परंपरा, रंग आणि सामुदायिक भावनेने भरलेल्या मौजेचे आश्वासन देतो.

यंदाच्या उत्सवात माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे; माननीय मत्स्योद्योग मंत्री श्री नीळकंठ हळर्णकर; जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश सी. गावकर; आमदार, शिवोली मतदारसंघ, डिलायला लोबो; आमदार, कळंगुट मतदारसंघ, श्री मायकल लोबो; सचिव पर्यटन, श्री संजीव आहुजा, आयएएस; पर्यटन संचालक, श्री केदार ए. नाईक; व्यवस्थापकीय संचालक, जीटीडीसी श्री कुलदीप आरोलकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.

*या कार्यक्रमाबद्दल बोलताना पर्यटन संचालक श्री केदार ए. नाईक* म्हणाले, की “शिवोलीतील सांजाव हा गोव्याच्या केवळ उत्साही मान्सून संस्कृतीचा उत्सव नसून हा उत्सव समुदायांना एकत्र बांधणाऱ्या व खोलवर रुजलेल्या परंपरांची आपल्याला आठवण करून देतो. अशा उत्सवांद्वारे, आम्ही समुदाय-केंद्रित पर्यटन अनुभवांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो, जे स्थानिक ओळखीचा सन्मान करतात आणि पर्यटकांना आकर्षक अनुभव देतात.”

गोव्याच्या वारशात रुजलेला आणि अतुलनीय उत्साहाने साजरा केला जाणारा, शिवोलीतील सांजाव महोत्सव हा राज्यातील सर्वात विशिष्ट अश्या मान्सून उत्सवांपैकी एक आहे. या वर्षीचा उत्सव भव्य अश्या पारंपारिक बोट परेडने सुरू होईल, जिथे सुंदर सजावट केलेले फ्लोट्स आणि उत्सवी पोशाख परिधान करून लोक सहभागी होतील. दरवर्षीप्रमाणे हजारो प्रेक्षकांना आकर्षित करणारी पाण्यातून मनमोहक अशी मिरवणूक निघेल. गोवा पर्यटन देखील बोट परेडमध्ये एक खास डिझाइन केलेली बोट आणि मान्सून मास्कोटसह सहभागी होईल. त्यानंतर, या प्रसंगी खास तयार केलेल्या संकल्पनेवर आधारित नृत्य सादरीकरण होईल.

या उत्सवात गोव्यातील पारंपारिक लोकनृत्ये आणि लाईव्ह संगीत देखील सादर केले जाईल, जे राज्यभरातील कलाकारांना एकत्र आणेल. सांस्कृतिक परंपरेचा एक भाग म्हणून, गोव्यातील सांजाव उत्सवांचा वारसा पुढे सुरु ठेवताना विहिरी आणि ओढ्यांमध्ये आनंदाने प्रतीकात्मक उडी घेतली जाईल.

या उत्सवातील इतर आकर्षणांमध्ये दीर्घकाळ चालत आलेले ओझे आणि धाली परंपरा, कोपेल स्पर्धा तसेच आधुनिक चैतन्यशीलतेसह उत्सवाच्या भावनेचे मिश्रण असलेले आकर्षक सादरीकरण समाविष्ट आहे. या वर्षी कार्यक्रमांच्या यादीमध्ये युवा बँड क्ले जार्सचे उत्साही सादरीकरण, जॉनी बी गुड आणि रेझा यांचा एक विशेष संगीतमय कार्यक्रम आहे.

हा कार्यक्रम रहिवासी आणि पर्यटक दोघांनाही तल्लीन करणारा अनुभव देताना, आमच्या समृद्ध व अमूर्त सांस्कृतिक वारशाचे जतन आणि प्रचार करण्याच्या गोवा पर्यटनाच्या वचनबद्धतेची पुष्टी देतो. उत्सवाच्या वातावरणात पारंपारिक रीतिरिवाजांवर प्रकाश टाकून समुदायांना एकत्र आणणे, चिरस्थायी आठवणी निर्माण करणे आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचे स्थान अधिक मजबूत करणे, हे या उत्सवाचे उद्दिष्ट आहे.

शिवोलीत नदीकाठच्या आकर्षक निसर्गरम्य स्थळी परंपरा आणि एकतेच्या या गतिमान उत्सवात सहभागी होण्यासाठी जनतेला, पर्यटकांना आणि संस्कृतीप्रेमींना आमंत्रित केले आहे.